यूपीच्या छपरा शाळेत एका 9 वर्षाच्या बालिकेवर शिक्षक, मुख्यधापक सहित 15 विद्यार्थी बलात्कार करतात तेव्हा.
भारत महिला असुरक्षिततेत पहिल्या क्रमांकावर जेव्हा येतो तेंव्हा देशात होणाऱ्या महिलांवरच्या बलात्काराला कोणत्या एका अंगाने पाहुन भागत नाही पॉर्न व्हिडीओ पाहिल्याने बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, मुली शॉर्ट घालतात त्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे, संस्कृती लोप पावल्यामुळे बलात्काराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक अंगाने पाहून बलात्कारचं विश्लेषण करता येईल का हा प्रश्न कायम आहे.
नुकताच यूपी एका शिक्षणाच्या मंदिरात झालेल्या सामूहिक बलात्काराचा आपण विचार केला तर त्यात बलात्काराचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मुख्यध्यापक सहित 18 विध्यार्थ्यांन कढून बलात्कार केला जातो तेव्हा या घटनेत काही विचारवंत प्रवक्ते म्हणतात की "इतक्या दिवस बलात्कार करत असताना त्या बलिकेने घरी अथवा पोलीस ठाण्यात सांगण्याची हिम्मत का केली नाही" तर त्याचा अर्थ त्यांनी कोणत्या अंगाने लावला असेल ते त्यांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला माहीत, परंतु बलात्काराकडे पाहतांना तो बलात्कार वासना क्षमवण्या साठी किंवा बदला घेण्यासाठी झाला असेल अस म्हटलं तर मूर्ख पणाच ठरत, कारण बलात्काराला जात, वर्ग, वर्ण, पितृसत्ताक आणि मग नंतर मानसशास्त्रीय दृष्टीने राग, द्वेष, वासना ही कारण कारणीभूत ठरतात. पितृसत्ताक संस्कृतीत स्त्री ला आधीपासूनच दुय्यम लेखण्यात आले आहे स्त्री ला उपभोगाची वस्तू समजण्यात आलेली आहे त्यामुळे बलात्कार वासनेच्या पलीकडे जाऊन होत असतो याच साधं उदाहर द्यायचं झाल्यास प्रियकर-प्रियसी किंवा पत्नी-पती यांच्यात संमतीने झालेला संभोग जो पर्यंत असतो तो पर्यँत तो बलात्कार नसतो परंतु प्रियसीची किंवा पत्नीची इच्छा नसते तेव्हा जबरदस्तीने केलेला संभोगाला आपण बलात्कार म्हणू शकतो यात शंका नाही यावर मी माज्या "पाच रुपायातही विकला जातो बलात्कार" या लेखात मी सविस्तर लिहिलं आहे.
तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी.
suryawanshitushar41@gmail.com
महात्मा फुले कोण होते. अशी एक घटना 15 व्या शतकात घडली गेली ज्या घटनेमुळे बहुजनांच कल्याण झालं एक माणूस जो जातीने क्षत्रिय माळी होता आपल्या ब्राम्हण मित्राच्या आग्रहाने लग्नसमारंभात गेला, नवरा मुलगा नवरीकडे वर्हाडी मंडळी साहित मिरवीत जात होता त्या मिरवणुकीत ब्राम्हण बायका, पुरुष आणि मूल देखील होती, त्या ठिकाणी इतर जातीचे लोक क्वचितच होते तो व्यक्ती त्या मिरवणुकीतील मंडळी सोबत चालत होता. कोणत्याही प्रकारची त्याला कल्पना नव्हती की आता आपल्या सोबत काय होणार आहे ते तितक्यात ब्राम्हनाचा ज्वलंत अभिमान बाळगणाऱ्या काही सनातनी ब्राम्हणांनी त्याला ओळखले. ब्राम्हण भुदेवाबरोबर कनिष्ठ वर्गातील एका शूद्र माळ्याच्या मुलाने लग्नाच्या मिरवणुकीत बरोबरीने चालावे हे म्हणजे चुरण खाऊन जेवण न पचल्या सारखे होते, संतापाने काही ब्राम्हण बेभान झाले, त्यांच्यापैकी एकजण त्या माणसावर जोरात ओरडला आणि म्हणाला “ब्रम्हासंगे रस्त्यातून चालायला तुजी हिंमत झालीच कशि? अरे शूद्रा तू जातीपातीचे सगळी बंधने आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोस! तू आमच्या बरोबरीचा आहे असं समजतो की काय? असं लागण्य
Comments
Post a Comment