महात्मा फुले कोण होते.

         अशी एक घटना 15 व्या शतकात घडली गेली ज्या घटनेमुळे बहुजनांच कल्याण झालं एक माणूस जो जातीने क्षत्रिय माळी होता आपल्या ब्राम्हण मित्राच्या आग्रहाने लग्नसमारंभात गेला, नवरा मुलगा नवरीकडे वर्हाडी मंडळी साहित मिरवीत जात होता त्या मिरवणुकीत ब्राम्हण बायका, पुरुष आणि मूल देखील होती, त्या ठिकाणी इतर जातीचे लोक क्वचितच होते तो व्यक्ती त्या मिरवणुकीतील मंडळी सोबत चालत होता. कोणत्याही प्रकारची त्याला कल्पना नव्हती की आता आपल्या सोबत काय होणार आहे ते तितक्यात ब्राम्हनाचा ज्वलंत अभिमान बाळगणाऱ्या काही सनातनी ब्राम्हणांनी त्याला ओळखले.
     ब्राम्हण भुदेवाबरोबर कनिष्ठ वर्गातील एका शूद्र माळ्याच्या मुलाने लग्नाच्या मिरवणुकीत बरोबरीने चालावे हे म्हणजे चुरण खाऊन जेवण न पचल्या सारखे होते, संतापाने काही ब्राम्हण बेभान झाले, त्यांच्यापैकी एकजण त्या माणसावर जोरात ओरडला आणि म्हणाला
     “ब्रम्हासंगे रस्त्यातून चालायला तुजी हिंमत झालीच कशि? अरे शूद्रा तू जातीपातीचे सगळी बंधने आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोस! तू आमच्या बरोबरीचा आहे असं समजतो की काय? असं लागण्यापूर्वी यु शंभर वेला विचार करावयास पाहिजे होता, चल हो मागे आणि चालू लाग आमच्या पाठी मागे”
     त्या माणसाला थोडावेळ काही सुचेनासे झाले तो वरातीतून बाहेर पडला आणि भावनेवर येताच त्याचा स्वाभिमान उसळू लागला ते अपमानकारक शब्द त्याच्या जीवाला झोम्बत होते त्याच्या शरीराच्या रक्ता रक्तात रोमारोमात मेंदूतल्या कापयकप्यात अपमानाची सल उसळू लागली आणि त्या आपमानातून त्याच्या मनात क्रांती आणि क्रांती सोबत निर्माण झालं ते

विद्दे विना माती गेली | मति विना नीती गेली

नीती विना गती गेली | गती विना वित्त गेले 

वित्त विना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्धेने केले.

      अपमानातून बदलाची परिवर्तनाची जोत पेटली आणि मनाशी निश्चय केला आता ही परिस्थिती बद्दलवायची आहे आणि ती बद्दलवायची असेल तर या समाजाला शिक्षित केलं पाहिजे मति, नीती, गती, आणि वित्त दूर करण्यासाठी ज्या पुण्यामध्ये जिजाऊ, शिवराय यांनी प्रस्थापित धर्म व्यवस्था नाकारून सोन्याचं नांगर फिरवून स्वराज्याची स्थापना केली त्याच पुण्यात बहुजनांचा कैवारी, गुलामाची मुक्तिदाता शेतकऱ्यांच्या पालनकर्ता ज्याला ‘भीमराव रामजी आंबेडकर’ यांनी गुरू स्थानी ठेवलं ज्यांना येरवडा तुरुंगातू १८३२ च्या मे महिन्यात गांधीजी उद्गारतात की “ज्योतिबा हेच खरे महात्मा आहेत”
त्या त्या माणसाचं नाव होतं
“महात्मा जोतीराव गोविंदराव फुले”
ज्योतिबा यांचा जन्म ११एप्रिल १८२७ ला झाला जोतिबांच्या आईचे नाव चिमनाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते ज्योतिबा लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले वडील फुलांचा व्यवसाय करायचे त्यांनी ज्योतिबासाठी दाईची व्यवस्था केली, पुणे झहहरात पेशवाईचा पूर्णपणे बिमोड झाला होता ब्रिटीश राजसत्ता शासन प्रशासन राबवित होते त्यामुळे “मनुसमूर्ती” साहितेतील बहुजन समाजावर लादलेली बंदी उठवली होती तथापि नवीन राज्यकर्त्यांसोबत नवीन निर्भन्ध आले होते. ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या १८१३ मध्ये भारतात पहिल्यांदाच शिक्षण सुरू झाले पुढे १८२४ साली ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी मराठी शाळा काढल्या होत्या फुल्यांना शाळेत घालण्यात आले. ज्योतिराव अत्यंत तल्लख व बुद्धिमान होते पाहिल्याक वर्षी त्यांचे वेगळे पण प्रभाव निर्माण करत होते परंतु गोविंदरावांचा कारकून हा एक ब्राम्हण होता त्याच्या लक्षात आले की ज्योतिराव हा हुशार आहे हा जर शिकला तर आपली नोकरी जाईल म्हणून त्याने गोविंदराव यांचे कण भरून ज्योतिराव यांना घरी बसवले ज्योतिराव सतत सहा वर्षे उत्तम प्रकारे फुल शेती करून व्यवसाय करत होते गोविंदरावाणी सातारा जिल्यातील नायगाव येथील ‘खंडोबा नवस पाटील’ यांची सर्वगुण संपन्न कन्या सावित्री यांच्या सोबत ज्योतिराव यांचा विवाह करून दिला त्याच वेळेस फुलेंच्या शिक्षणाच्या गाळीला दोन चाक पूर्ण झाली आणि शिक्षणाची गाडी आता पक्की झाली होती लवकरच ती समाजात फिरणार होती.
     ज्योतिराव यांच्या बागे शेजारी ‘गफ्फार बेग मुन्शी’ आणि त्यांचे सहकारी ‘लिजीट’ हे दोन सहकारी राहत असे ज्योतीबा त्यांच्याकडे फुल द्यायला जायचे तेव्हा ते दोघेही सहकारी चर्चा करत त्या चर्चे मध्ये तज्योतिराव सहभाग घेत हे पाहून त्या डॉग सहकारी यांना आचार्य होई तेव्हा गफ्फार शेख मुन्सी आणि लिजीट यांच्या सांगण्यावरतून गोविंदरावानि ज्योतिबाना १८४१ ला वयाच्या १४ व्या वर्षी इंग्रजी पहिल्या वर्गात घातले आणि या मिळालेल्या संधीच सोन करीत जोतिबा खूप शिकलेत पुढे चालून ज्योतिराव यांना एकूण ---------------- भाषा येत होत्या ज्योतिरावाणी “विख्यात विचार-प्रवर्तक थॉमस पेन” या बंडखोर लेखकाचा “राइट्स ऑफ मॅन” हा ग्रंथ वाचला होता त्यामुळे त्यांच्या आयुष्यात फार बदल झाला होता. ते म्हणत “अज्ञान म्हणजे अंधार व शिक्षण म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश” ज्योतिरावाणी 1 जानेवारी १८४८ रोजी एक मोठी क्रांती केली ज्या क्रांतीमुळे ‘मुक्ता साळवे’ ह्या मातंग समाजातील विद्यार्थिनींने सॅन १८५५ मध्ये धर्मा विशद बंडखोर निभांड लिहिला, याच क्रांती मूळे “ताराबाई शिंदे” सारखी महिला १८६२ मध्ये “स्त्री-पुरुष तुलना” हे पुस्तक लिहून जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका निर्माण केली, यांचं क्रांतीने तानुबाई बिर्जे ही जगातील पहिली वृत्तपत्र संपादिका होऊ शकली, याच क्रांतीमुळे दि. २३ डिसेंबर रोजी ------------ पहिली महिला indian nevi झाली याच क्रांतीमुळे आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे ती क्रांती म्हणजे स्त्री शिक्षणाची क्रांती १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात जोतीराव यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलि सुरवातील कोणीही मुलींना शाळेत पाठवायला तयार नव्हते कारण शिक्षण म्हणजे काय हे त्यांना काहीच माहीत नव्हतं परंतु फुले यांनी आपले प्रयत्न पुढें चालूच ठेवले बगता बगता एक दोन तीन मुलीची संख्या वादु लागली.

      इथल्या व्यवस्थेने लोकांच्या मनात इतकी भीत निर्माण केली होती की एकदा गमत्त्तच झाली एक माणूस आपल्या लहानश्या मुलीला ब्राम्हणाच्या भीतीने गोणीत बांधून घेऊन आला होता इतकी गुलामी इथल्या लोकांमध्ये निर्माण झाली होती परंतु ज्योतिराव म्हणत.

आतातरी तुम्ही मागे घेऊ नका | धि:कारूनी टाका मनुमत 

विद्दा शिकताच पावलं ते सुख | घ्यावा माझा लेख जोती म्हणे

असे करता करता संस्थेच्या विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली आणि १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली परंतु ते सर्वच सांभाळणं आता ज्योतिराव श्यक्य होत नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या पत्नी सावित्री माई यांना घरीच शिकवलं आणि जागांची पाहिली शिक्षिका आणि मुख्यधापिका बनवलं आणि दोघ मिळून शिक्षणाचं कार्य करू लागले यात त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला सावित्री माई जेव्हा मुलींना शिकवायला जायची तेव्हा तेवा ही मनुवादी लोक त्यांना दगड, शेण मारत त्यांच्या अंगावर थुंकत परंतु हा सर्व त्रास सहन करत ते मुलींना शिकवत राहिल्या.
      एवढ्यावर न थांबता ज्योतिरावाणी जाती निर्मूलणाच देखील काम केलं देशाला व धर्माला जातीभेद हा मोठा कलंक आहे. त्याला समतेच्या, समानतेच्या, बंधुतवाच्या न्यायाच्या तत्वावर उभा करण्यासाठी २० मार्च १८७७ ला पर्यायी व्यवस्था दिली ती म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म या सार्वजनिक सत्य धर्मात ३३ कलम आहेत ते सर्वच कलम इथल्या लोकांतील गुलामी नष्ट करेल यातला गमतीचा भाग म्हणजे ब्राम्हणांनी महात्मा फुलेंना मारायला पाठवलेला एक महार माणूसच पुढे सार्वजनिक सत्यधर्म चा अध्यक्ष झाला,
        इतकेच नाही तर अस्पृश्यता हा देखील खूप मोठा प्रश्न होता त्यासाठी ज्योतिरावाणी आपल्या घराची पाण्याची विहीर आणि आपलं घर अस्पृशांसाठी खुली खेली १८७३ साली गुलामरी हे पुस्तक लिहून इथल्या अस्पृश्य गुलामांना त्यांची गुलामीची आणि अस्पृश्याची जाणीव करून दिली,
       इथेच न थांबता ज्योतिराव शेतकरयांचे देखील कैवारी होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी इंग्रज सत्ते विरोधात मोठा लडा उभारला त्यांनी १८ जुलै १८८३ रोजी “शेतकऱ्यांचा असूड” हे पुस्तक लिहल,
पुढे जाऊन ज्योतिरावाणी बालहत्या प्रतिबंध गृह देखील उभारल होत समाजातील विकृत मनोवृत्तीच्या बाली ठरलेल्या विधवा वा कुमारी गर्भधारणा झाल्यानंतर बेइज्जत टाळण्यासाठी अनेकदा आत्महत्त्या करत त्या महिलांसाठी जोतीराव यांनी “ व्हिक्टोरिया बालआश्रम” सुरू केले होते त्या ठिकाणी या महिला येऊन आपलं मूल टाकून जात होते आश्च प्रकारे संकटात सापडलेल्या काशी नातू नावाच्या एका ब्राम्हण समाजातील बघिणीवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती त्या ब्राम्हण महिलेला ज्योतिरावाणी आत्महत्या करीत असतांना थांबवलं आणि तिला आधार दिला पुढे जाऊन त्याच काशीबाईचा मुलगा यशवंत याला फुले आणि सावित्री माई यांनी मुलगा म्हणून दत्तक घेतला आणि तोच यशवंत पुढव डॉ. झाला त्याने शेवट पर्यंत मोफत गरिबांची सेवा केली ज्योतिरावाणी १७ मे १८७७ ला एक दुष्काळविषयक विनातीपत्रक लिहून जनतेला मदतीसाठी आव्हान केले होते.
           याठिकाणी ज्योतिराव थांबत नाही त्यांनी मुलीच्या बालविवाहमुळे अनेकदा मुली तरुण वयातच विधवा होत होत्या, पतीच्या मृत्यूनंतर धर्मातील तरतुदी नुसार मुलीना सती जावं लागत होतं किंवा तिचे केस भादरले जात होते या प्रथेचा ज्योतिरावाणी जोरदार विरोध केला आणि सर्व न्हावी एकत्र करून न्हाविंच संप घडून आणला आणि सांगितलं की पत्नी मृत पावल्या नंतर जर पतीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार असेल तर पती वापरल्या नंतर पत्नीला सुद्धा अधिकार आहे दुसरं लग्न करण्याचा जर ती आयुष्यभर एकटी राहत असेल तर पुरुषांनीही आयुष्यभर एकटच राहावं.
     ज्योतीराव यांनी इंग्रजी भाषेचा पुरस्कार देखील केला होता, त्यासाठी त्यांनी पहिली पासून इंग्रजी भाषा असावी याचा आग्रह केला, इंग्रजी ही जागा भाषा होणार याच अंदाज जोतीराव यांना १५० वर्षा पूर्वीच आला होता आज जगभरात विज्ञानामुळे-संगणाकामुळे  इंग्रजी भाषेत मोठं मोठे प्रयोग होताना आपल्याला दिसत आहे याचं बरोबर जोतिरावाणी १९-११-१८८२ ला हंटर शिक्षण आयोग पुळे एक निवेदन सादर केला होता, त्या निवेदनात फुले म्हणतात शाळेची संख्या वाढलेली असली तरी समाजाची गरज भागविण्याचे दृष्टीने ती मुळीच पुरीशी नाही. म्हणूनच माझी आपणास विनंती आहे की आपण शाळेच्या संकेत वाढ करावी त्याच बरोबर या वर्गाला आपली मुले शाळेत पाठविण्यास उत्तेजन मिळावे आणि त्यामध्ये विद्देची गोडी निर्माण व्हाव म्हणून शिष्यवृत्ती व सहामाही किंवा वार्षिक बक्षिसांची विशेष प्रलोभने ठेवावे त्याच बरोबर वयाच्या बाराव्या वर्षा पर्यँत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे. इतका सलोखा दृष्टीकोण फुल्यांनि शिक्षणाच्या संदर्भात ठेवला होता आज त्या पत्रावर जर भारत सरकारने अंमल केल्यास नखीच भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल झाल्याशिवाय राहणार नाही.
      इतर गोष्टींबरोबर फुल्यांनि अंधश्रद्धा निर्मूलणाच देखील काम केलं पूर्वी स्रिया जर शिकल्यात व त्या शिकलेल्या स्रियांना जर तांदूळ शिजवला तर त्या तांदळाच्या आळया होतील इतके शिक्षण स्रियांसाठी शिक्षण वाईट आहे समजलं जातं होत परंतु फुल्यांनि आपल्या पत्नीस सावित्री माईस घरीच शिकवून पहिला महिला शिक्षिका, मुख्यधापिका बनवल आणि अंधश्रद्धा मोळीत काढली, कशा प्रकारे ब्राम्हण इथल्या गरीब शेतकरी वर्गाला अंधश्रद्धा बाळगून ठसवतो हे त्यांनी लिहिलेल्या १८५५ मध्ये तृतीय रत्न नाटकात दाखवून दिले आहे त्या ब्राम्हणाची पोल खोलण्यासाठी (१८७३) मध्ये ब्राम्हणाचे कसब हा ग्रँथ लिहून काढला.
      फुल्यांनि कधीच कोणत्या धर्माला कमी लेखले नाही कारण धर्माची चिकिस्ता करणारे ज्योतिराव म्हणतात

अर्थाच्या इराणी नाही भेदा भेद | घ्यावा हाच शोध | वेदांमध्ये ||

गोड-भिल्ल-क्षेत्री होते मूळ धनी | इराणी मागुणी | आले येथे ||

दिंगांना मांडीला आर्य भटोबानी | स्वदेशभिमानी | रक्षु गेले ||

यज्ञभांग केले झोडिले भूटले | दस्यु नाव दिले || ब्राम्हणांनी ||


इतकेच नाही तर फुल्यांनि “हजरत महंमद पैगंबराचा” पोवाडा देखील लिहिला होता ते म्हणतात,

महंमद झालं जहामर्द खरा | त्यागिले संसार | सत्यासाठी ||

खोटा धर्म सोडा- सांगे जगताला | जन्म घालविला | इशापाई

जगहितासाठी लिहिले कुराण | हिमत्तीचा राणा | जगविर

जगाचा पालक निर्मिक अनादी | सर्वकाळ वंदि | निके सत्य

मन केले धीट, घाईल उमदे | नाही भेदाभेद | ठावा ज्याला

आशा पद्धतीने इस्लाम धर्माचं आणि हजरत महम्मद पैगंबाराचा गौरव आणि सन्मान आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून केला.
  जोतिरावाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून १८६९ मध्ये समाधीचा उद्गार केला आणि १९ फेब्रुवारी १८७० मध्ये भारतातील नाही तर संपूर्ण देशातील पहिली शिवजयंती काडून शिवजयंतीचे जनक म्हणून मान मिळवला त्याच बरोबर शिवरायांवर जागच्या पाठीवर पहिल्यांदा १८६९ मध्ये ९०८ ओळींचा “कुळवाळी भूषण” नावाचा पोवाडा लिहला त्यात ज्योतिराव म्हणतात

लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा

काळ तो असे यवनांचा।।

शिवाजी पिता शहाजीस पुत्र मालोजीचा

असे तो डौल जहागिरीचा।।

पंधराशे एकूनपन्नास झालं फळले

जुन्नर ते उदयासी आले।।

शिवनेरी किल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले

जिजाबाईस रत्न सापडले।।

            असा प्रकारे समस्त जगाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किर्तीची ओळख फुल्यांनि करून दिली.
 असे अनेक साहित्य फुल्यांनि लिहिले त्यात १८५५ च तृतीय रत्न नाटक, जून १८६९ च विद्याखात्यातील ब्राम्हण पंतोजी यांचा पोवाडा, १८६९ चे ब्राम्हणाचे कसब, १८७३ ची गुलामगिरी, २० मार्च १८७७ चा पुणे सत्यशोधक समाजा रिपोर्ट, २४ सप्टेंबर १८७६ सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत, १२ एप्रिल १८७७ चा पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ, २४ मे १८७७ चा दुष्काळविषयक विनंतीपत्रक, १९- १०- १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन, 18 जुलै १८८३ शेतकऱ्यांचा आसूड, ४ डिसेंबर १८८४ चे महात्मा फुले यांचे मालवारीच्या दोन टिपनिंविषयीचे मत,११ जून १८८५ मराठी ग्रंथकार सभेस पत्र, १३ जून १८८५ ते १०- १८८५ चे सतसार अंक १ आणि २, असे भरपूर साहित्य त्याचे आपल्याला पाहायला वाचायला उपलब्ध आहेत.
        अशा या महान अस्पृश्य, आदर्शनीय समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा काढणारा पहिला भारतीय, आधुनिक भारतातील श्रीशिक्षणाचा जनक, भारतीय स्रियांचे हक्क व स्वतंत्र ह्यांचा उदगाता, शेतकरी व कामगार ह्यांची दुःख दारिद्र निवारण्यासाठी चळवळ उभारणार पहिला पुढारी, जातीभेद संस्थेवर कडाडून हल्ला चडवुन मानवी समानतेची घोषणा करणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते ह्या तत्वाने भारून गेलेला खरा सत्यशोधकाला त्याच्या स्मूर्थी दिनी त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या कवितेच्या काही शब्दात त्यांना शतशहा नमन.

तुषार पुष्पा दिलीप सूर्यवंशी. ( ती&तु)
९५०३५२१२३५.

Comments

Popular posts from this blog

लोकतंत्र की लड़ाई में युवा वर्ग कहा हैं?