प्रिय गरिबी.
आज तू मला तुझ्यावर लिहिण्यास मजबूर केल परंतु तुझ्यावर लिहीत असताना दोन प्रश्न मला पडलेत, एक म्हणजे तुला प्रिय तरी का? म्हणाव, आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर लिहिल्या नंतर तुझ्या पर्यंत हे लिखाण कस कुठे आणि केव्हा पोहचवाव, कारण तू कधी कुठे आणि कशी भेटशील याची खात्री नाही. तशी तू नेहमी असतेच एक वेळ जेवणाऱ्याजवळ, झोपडीत, रस्त्यावर झोपणाऱ्या जवळ, खूप असून उपाशी असणाऱ्या जवळ, तू दिसतेही मला दररोज गाडीत भीक मांगताना, पोटासाठी भर उन्हात राबत्तांना, बैल नाही म्हणून स्वतःला नांगराला जुपतांना, शिक्षणासाठी उपाशी राहून काम करतांना, पैशा साठी देह विकत्तांना, पैसे नाहीत म्हणून देह कापतांना, कधी एका वेळेच्या भाकरीत, तर कधी पोट भराव म्हणून पिणाऱ्या पाणीत अशा अनेक ठिकाणी मी तुला पाहिलं अनुभवलं परंतु तुला कधीच कोणती तक्रार केली नाही परंतु आज मात्र मला असहाय्य झालं. सांग ना जन्माला आलो तेव्हा तूच भेटली, आणि तेव्हा पासून अजूनही मला सोडायला तयार नाही, अजून किती तुला सहन करायच, अजून किती रात्र उपाशी झोपायचं, तिने दिलेले पैशे नेहमी शिक्षणालाच लागतात मग ती विचारते जेवलास का तेव्हा ईच्या नसताना तिला सांगाव लागत हो झालं जेवण, अजून किती त्या माऊली सोबत खोट बोलायच, नेहमीच सर्व म्हणतात परिस्थितीने गरीब असला म्हणून काय झालं मनाने श्रीमंत आहे ना! त्यांना आता काय सांगावं माझं मन माझं पोट भरत नाही, समाजात जरी चांगलं मन नाव कमवत असलं तरी समाज गरजेला मदत करत नाही, म्हणतात सर्वच इथं काही मदत लागली तर सांग पण मदत करणं दूर पण ऐकनही त्यांना जमत नाही, अगदी लहानपणापासून तुला जवळून पाहिलं पण आता तू नकोशी वाटते, कारण पदो पदी आज तूच मला भेटते तुझ्या मुळेच मला समाज अमान्य करतो, पण तरी कधी कधी तुच जगणं ही शिकवते, तुझ्या मूळे आज मी समाज भूषण झालो, समाजात मला तूच उगवते पण तरीही मला खाली पोट झोपवते, तुझ्या मुळे माझ्या बापन मला सोडल, नातेवाईकांनी कधी जवळ नाही केलं , मित्रांनी तिरस्कार केला, पदो पदी अपमान झाला सहन केला उभा राहिलो, पण तुला माझ्यावर एकदाही दया आली नाही, एकदाही वाटलं नाही की आता संपवू याची तक्रार आणि जगुदेयू याला सुखाने, परंतु तुही लक्षात ठेव नको मला तुझी दयेची भीख मलाही स्वाभिमान आहे.
पण एक दिवस येईल की तू स्वताहून मला सोडून जाशील पण मी तुला सोडणार नाही कारण मला माहित आहे आज तू मला सोडलं तरी दुसऱ्याला पकडणारच आहे, आणि पुन्हा कोणाच्या तरी आयुष्यात अंधार करणार आहे, आज मी मेणबत्ती सारखा जळतोय आणि असाच जळत राहील आणि एक दिवस वितळणाऱ्या मेणबत्ती सारख तुला ही जळवेल.
तुझाच.
TUSHR PUSHPA DILIP SURYAWANSHI.
महात्मा फुले कोण होते. अशी एक घटना 15 व्या शतकात घडली गेली ज्या घटनेमुळे बहुजनांच कल्याण झालं एक माणूस जो जातीने क्षत्रिय माळी होता आपल्या ब्राम्हण मित्राच्या आग्रहाने लग्नसमारंभात गेला, नवरा मुलगा नवरीकडे वर्हाडी मंडळी साहित मिरवीत जात होता त्या मिरवणुकीत ब्राम्हण बायका, पुरुष आणि मूल देखील होती, त्या ठिकाणी इतर जातीचे लोक क्वचितच होते तो व्यक्ती त्या मिरवणुकीतील मंडळी सोबत चालत होता. कोणत्याही प्रकारची त्याला कल्पना नव्हती की आता आपल्या सोबत काय होणार आहे ते तितक्यात ब्राम्हनाचा ज्वलंत अभिमान बाळगणाऱ्या काही सनातनी ब्राम्हणांनी त्याला ओळखले. ब्राम्हण भुदेवाबरोबर कनिष्ठ वर्गातील एका शूद्र माळ्याच्या मुलाने लग्नाच्या मिरवणुकीत बरोबरीने चालावे हे म्हणजे चुरण खाऊन जेवण न पचल्या सारखे होते, संतापाने काही ब्राम्हण बेभान झाले, त्यांच्यापैकी एकजण त्या माणसावर जोरात ओरडला आणि म्हणाला “ब्रम्हासंगे रस्त्यातून चालायला तुजी हिंमत झालीच कशि? अरे शूद्रा तू जातीपातीचे सगळी बंधने आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोस! तू आमच्या बरोबरीचा आहे असं समजतो की काय? असं लागण्य
Comments
Post a Comment